मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

शोधांच्या गोष्टी- नेपच्यूनचा शोध

विल्यम हर्षल यांना 13 मार्च 1781 रोजी स्वतः बनवलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करतांना युरेनस या ग्रहाचा शोध लागला. या शोधाबरोबरच खगोलशास्त्रात एक समस्या उभी राहिली. न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार युरेनसची भ्रमणकक्षा आणि त्याची प्रत्यक्ष भ्रमणकक्षा यांत तफावत आढळून येत होती. हे असं का होतं असावं? न्युटनचा नियम तर चुकला नसेल ना? युरेनस असं का वागत असेल? असे प्रश्न उपस्थित झाले. बरीच लोकं यावर काम करत होती. सर्व बाजूंनी विचार करून कुणालाही उत्तर मिळत नव्हते. 
1841 साली केंब्रिज विद्यापीठात खगोलशास्त्र शिकणाऱ्या जॉन अॅडम्स या विद्यार्थ्याला मात्र न्युटनच्या नियमावर विश्वास होता. त्याला असं वाटलं की युरेनसच्या भ्रमणकक्षेवर परिणाम करणारं एखादं गुरूत्वबल ग्रहाच्या स्वरूपात असावं आणि न्युटनच्या नियमाप्रमाणेच ते युरेनसवर कार्य करत असावं. मग या भल्या मोठ्या अवकाशात तो ग्रह शोधायचा कसा? यावर त्यानं वेगळीच शक्कल लढवली. त्याच्या मते या ग्रहावर सुर्य, गुरू, शनी व युरेनस यांचं गरूत्वबल कार्यरत असेल मग त्यानं सुर्यापासून या ग्रहांची अंतरं बघितली असता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे शनिचे सुर्यापासूनचे अंतर गुरूच्या सुर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दुप्पट आहे आणि युरेनसचे सुर्यापासूनचे अंतर शनिच्या सुर्यापासूनच्या अंतराच्या जवळजवळ दुप्पट आहे. यावरून तर्काच्या आधारावर शोधत असलेल्या नव्या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर काढले. एवढं करून पुरेसं नव्हतं तर युरेनसच्या बदलेल्या कक्षेवरून त्या ग्रहाची गती आणि अवकाशातील स्थानही गणिताने शोधावं लागणार होतं. ही सारी गणितं पुर्ण होण्यासाठी 1845 साल उजाडावं लागलं. एवढं करूनही अवकाश निरीक्षणासाठी शक्तिशाली दुर्बिण वापरण्याची परवानगी अॅडम्सला मिळाली नाही. 
23 सप्टेंबर 1846 रोजी बर्लिन वेधशाळेतून या गणिताच्या आधाराने अवकाश निरीक्षण करतांना गॉटफ्रिड गॉल व हेन्रीच दारे या दोघांना हा नवीन ग्रह सापडला तो म्हणजे नेपच्यून. 
इतिहासात प्रथमच कागदावरील गणिताच्या सहाय्याने अवकाशातील ग्रहाचा शोध लागला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...