मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Science Aptitude Test 2024

Science Aptitude Test is conducted by Vidnyankatta since 2020 to nurture the highschool students having interest in Science. Science Aptitude Test provides an opportunity for students to prepare themselves for various competitive exams in Science at highschool level Qualification: Students of class 6 & class 9 Separate question paper for each standard Syllabus: General Science (As per MH state board & relevent topics from NCERT textbooks) Medium: English and Marathi Online exam will be on 25 May 2024 at 11 am Total Marks: 100 Questions: 90 Duration: 90 Minutes You will receive the link to solve the exam on the date of the exam Prizes: 1st Prize: Certificate of excellence and a prize of ₹ 1000/- 2nd Prize: Certificate of excellence and a prize of ₹ 500/- 3rd Prize: Certificate of excellence and a prize of ₹ 300/- Result: On 14th June 2024 at 5 PM Result will be published on https://vidnyankatta.blogspot.com/

Science Aptitude Test

अलीकडील पोस्ट

पृथ्वी सपाट की गोल?

आपली पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नाचे उत्तर आज आपण अगदी सहजपणे देऊ शकतो कारण आपण अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो आज आपल्याकडे आहे, पण पूर्वीच्या काळी हे एवढं सोपं नक्कीच नव्हतं. त्यांच्याकडे कोणतीही आधुनिक साधनं किंवा साहित्य नव्हतं तरी पण त्यांची निरीक्षणं आणि वैज्ञानिक प्रयोग करण्याचं कसब मात्र उत्तम होतं. चला तर मग कसं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मिळवलं ते जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून पृथ्वीचा आकार गोल आहे हे लक्षात येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कमीत कमी 35000 फूट उंचीवरून निरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा समुद्रप्रवासाने गोलाकार पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत त्याठिकाणी येणे आवश्यक आहे. प्राचीन काळी एवढ्या उंचीवर पोहचण्याचे अज्ञात तंत्रज्ञान आणि समुद्र प्रवासाची भीती यामुळे आपल्या सभोवतालीचे जग हे सपाट आणि स्थिर असल्याचा समज निर्माण झाला. सूर्य आणि चंद्राचे पृथ्वीभोवती फिरतांना दिसणे यामुळे हा समज आणखी दृढ होत गेला. प्राचीन ग्रीक लोकांना मात्र पृथ्वी गोलाकार आहे याबद्दल कुठलीही शंका नव्हती याचे कारण त्यांनी केलेली निरीक्षणे, त्यांना असलेलं विज्ञान आणि गणिताचं ज्ञान हे होतं.

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन

कोपर्निकसच बरोबर असला पाहिजे

एकेकाळी बहुतेक सर्वजण मानत असे की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी असून इतर सर्व ग्रह आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या मान्यतेला धक्का देणारी एक हस्तपुस्तिका पोलंडमध्ये जन्मलेल्या मिकोलाज कोपर्निक ज्याला आपण आज निकोलस कोपर्निकस म्हणून ओळखतो याने स्वतः लिहून आपल्या मित्रांना वाटली. या हस्तपुस्तिकेत त्याने विश्वाची रचना मांडली ज्यामध्ये सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी तर इतर ग्रह आणि तारे सूर्याभोवती फिरतात. ही रचना पूर्णपणे बरोबर नसली तरी खागोलांच्या गतीबद्दल मानवाची समज वाढवण्यासाठी पुढील शास्त्रज्ञांसाठी ही पुस्तिका महत्वाची संदर्भ ठरली. चर्चला मात्र ही भूमिका मान्य नव्हती कारण चर्चच्या मते पृथ्वी आणि मानव सर्व विश्वात श्रेष्ठ आहे त्यामुळे सर्व विश्व हे पृथ्वीभोवतीच फिरलं पाहिजे. या हस्तपुस्तिकेतील रचना आणि स्वतः केलेली निरीक्षणे या आधारावर गॅलिलिओ आयुष्यभर चर्चसोबत भांडू शकला पण चर्चने कोपर्निकसला नेहमी खोटेच ठरवले. त्याच्या मृत्युनंतर कितीतरी वर्षांनी गॅलिलिओचे म्हणणे चर्चने सुद्धा मान्य केले की "कोपर्निकसच बरोबर आहे" आज 24 मे, निकोलस कोप

चंद्रग्रहण आणि ब्लडमून

आजचे चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण होते पण ते पृथ्वीच्या ठराविक प्रदेशातूनच दिसले आणि त्यावेळी चंद्र लाल रंगाचा दिसून आला याला इंग्रजीत ब्लड मून म्हणतात. हे ब्लड मून काय असतं? चंद्राचा रंग लाल का दिसतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पृथ्वीच्या वातावरणातच मिळू शकतील पण त्यासाठी आणखी मूळ प्रश्न विचारले पाहिजे की आकाशाचा रंग निळा का दिसतो? रात्री आकाश काळे का दिसते? सूर्य सकाळी आणि संध्याकाळी लालसर आणि दुपारी पिवळा का दिसतो? किंवा मग कोणत्याही वस्तूला स्वतःचा असा रंग असतो का नसतो? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला या ब्लड मूनचं रहस्य कळेल. चला तर मग जाणून घेऊया. कोणतीही वस्तू आपल्याला तेव्हा दिसते जेव्हा त्या वस्तूवर प्रकाश पडतो म्हणजेच अंधारात आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. वस्तूवर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडला की मग ती वस्तू आपल्याला दिसते म्हणजेच एखाद्या भिंतीच्या पलीकडील वस्तू मला दिसणार नाही. वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा सर्वच्या सर्व प्रकाश काही आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही. ज्या रंगाचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्या रंगाची ती वस्तू आपल्याला दि

निळा न दिसणारा निळा चंद्र

चंद्र निळा कधी असतो का? असा प्रश्न विचारला तर आपण म्हणू की काहीही हं! असं कधी असतं का? बरोबर आहे, कारण साधारणपणे दररोज आपण चंद्र बघत असतो आणि नेहमी तो पांढरा दिसतो. कधीतरी लाल रंगाची छटा दिसली की तो प्रकाशाचा परीणाम आहे असे आपण म्हणतो. मग 2021 वर्षीच्या नारळी पौर्णिमेच्या चंद्राला निळा चंद्र ( ब्ल्यू मून) म्हणत होते. असे का? नासाच्या म्हणण्यानुसार तर निळा चंद्र दर दोन-तीन वर्षांनी होणारी खगोलीय घटना आहे.  चला तर मग समजून घेऊया की हा नेमका प्रकार आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती 29.5 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. म्हणजे साडेएकोणतीस दिवसांनी पौर्णिमा येते आणि संपूर्ण चंद्र आपल्याला दिसतो. या साडेएकोणतीस दिवसांचा एक चांद्रमास (महिना) असतो. यावरून आपण असे मानतो की एका वर्षात बारा पौर्णिमा असतील पण चांद्रवर्ष केवळ 354 (29.5×12) दिवसांचेच असते. त्यामुळे दोन ते तीन वर्षांनी एका कॅलेंडर वर्षात एक चांद्रमास शिल्लक येतो म्हणजे एक पौर्णिमा जास्त (यालाच कदाचित अधिक मास असेही म्हणतात) यामुळे एका कॅलेंडर वर्षात आलेल्या या अधिकच्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात. एका कॅलेंडर महिन्यात आलेला दुसरा चंद