मुख्य सामग्रीवर वगळा

दुहेरी इंद्रधनुष्य

काल दुपारनंतर झालेल्या पावसाने दिल्लीकरांना दुहेरी आनंद दिला. एक म्हणजे गरमीच्या तडाख्यातून थोडासा थंडावा मिळाला आणि दुसरे म्हणजे दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. तसे पाहता दुहेरी इंद्रधनुष्य ही काही आश्चर्याची गोष्ट नसली तरी ती नेहमीच दिसते असेही नाही त्यामुळे त्याबद्दल नवल ते कायम असते.
प्रकाशाचे काही गुणधर्म असतात जसे की परावर्तन, अपवर्तन, अपस्करण इ. या सर्व गुणधर्मांचा एकत्रित परिपाक म्हणजे इंद्रधनुष्य होय. प्रकाशकिरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतांना माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात आणि थेंबाच्या मागील पृष्ठभागावरून परावर्तित होतात. एकदा परावर्तित झालेले किरण थेंबातून बाहेर पडताना पुन्हा एकदा माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सुर्यकिरणांतील विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन वेगवेगळ्या कोनांतून होत असल्याने सात तरंगलांबीचे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो.
आता गंमत अशी आहे की काही वेळा पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशाचे परावर्तन एकदा न होता दोनदा होते. सुर्य क्षितिजापासून जवळ म्हणजे खूप खाली असेल तेव्हा असं होण्याची शक्यता जास्त असते आणि अशावेळी आपल्याला दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन होते.
दुहेरी इंद्रधनुष्याच्या बाबतीत गमतीची गोष्ट अशी आहे की यातील दुय्यम इंद्रधनुष्यामध्ये ता ना पि हि नि पा जा हे रंग उलटे दिसतात. याचं कारणही प्रकाशाचं दोनदा होणारं परावर्तन हेच आहे.
हा दुय्यम इंद्रधनुष्य मुख्य इंद्रधनुष्याच्या वरच्या (बाहेरील) बाजूला अस्पष्ट व पसरट दिसतो. पाण्याच्या थेंबामध्ये जास्तीत जास्त तीन वेळा प्रकाशाचे परावर्तन होऊ शकते पण त्यामुळे तयार होणारा तिसरा इंद्रधनुष्य आपल्याला दिसू शकत नाही कारण तो सुर्य असलेल्या बाजूला असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मोबाईलची बॅटरी 100% झाल्यावर चार्जिंगला लावून ठेवली तर काय होते?

“मोबाईलची बॅटरी 100% झाली आहे, आता चार्जर काढ!” आपण घरात ही सूचना अनेकदा ऐकतो. पण खरंच 100% चार्ज झाल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला तर बॅटरी खराब होते का? मोबाईलचा स्फोट होऊ शकतो का? की आधुनिक मोबाईल स्वतःच चार्जिंग नियंत्रित करतात? चला, या रोजच्या जीवनातील प्रश्नामागचे विज्ञान समजून घेऊया!  सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट... आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) किंवा लिथियम-पॉलिमर (Lithium-polymer) बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये चार्जिंगचे नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असते. त्यामुळे बॅटरी 100% झाल्यानंतर चार्जर पूर्वीसारखा सतत मोठ्या प्रमाणात विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये ढकलत राहात नाही. म्हणजेच— “100% झाल्यावरही बॅटरीमध्ये सतत वीज भरत राहते” — हे योग्य नाही. मात्र याचा अर्थ 100% चार्ज झाल्यावर मोबाईल कायम चार्जिंगला ठेवणे पूर्णपणे चांगले आहे, असेही नाही. मग नेमके काय होते? 100% झाल्यावर चार्जिंग कसे नियंत्रित होते? मोबाईलमध्ये बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि चार्जची स्थिती तपासणारी Battery Management System (BMS) किंवा संबंधित चार्जिंग नियं...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...